प्रभाग ०९ भाजपचा बालेकिल्ला १६ तारखेला ४–० विजय निश्चित : मुरलीधर मोहोळ
ही रॅली प्रचारासाठी नव्हे तर विजयाचीच होती, असे स्पष्ट वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ यांनी केले. या रॅलीला नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि विश्वासाने प्रतिसाद दिला, हेच या विजयाचे संकेत असल्याचे त्यांनी सांगितले.प्रभाग ०९ भाजपचा बालेकिल्ला १६ तारखेला ४–० विजय निश्चित : मुरलीधर मोहोळ
प्रभागातील चारही उमेदवार निश्चितपणे जिंकतील, असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. प्रत्येक उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेल, याबाबत कोणतीही शंका नाही, असेही त्यांनी नमूद केले.
भाजपचा कार्यकर्ता विचाराने चालतो, संस्कृतीने काम करतो आणि निष्ठेने सेवा करतो, हीच भारतीय जनता पार्टीची ओळख असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. भाजपमध्ये व्यक्ती नव्हे तर पक्ष आणि विचारसरणीला सर्वोच्च स्थान दिले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभागातील चार उमेदवारांना मतदान करणे म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देणे असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपमधील प्रत्येक उमेदवार हा स्वच्छ, पारदर्शक आणि जनतेचा विश्वास संपादन करणारा आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विविध सर्वेक्षणांनुसार पुण्याचा पुढील महापौर भाजपचाच असणार, हे जवळपास निश्चित असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक ०९ हा भाजपचा बालेकिल्ला असून येथील मतदार कमळ चिन्हालाच मतदान करणार, असा ठाम दावा त्यांनी केला.
१६ तारखेला हा प्रभाग ४–० ने भाजपच्या पारड्यात जाणार, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.


